बंद

    परिचय

    जालना जिल्हयाविषयी

    • राज्याचे नाव : महाराष्ट्र
    • जिल्ह्याचे नाव : जालना
    • क्षेत्रफळ कि. मी. मध्ये: 7718 चौ.कि .मी
    • गट/गट विकास संख्या : 8
    • ग्रामपंचायतीची संख्या : 778

    लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार

    • एकून लोकसंख्या 19,58,483
    • पुरुष लोकसंख्या : 10,15,116 (51.84%)
    • महिला लोकसंख्या : 9,43,367 (48.16%)
    • अनुसूचित जाती लोकसंख्या : 2,72,266 (13.90%)
    • अनुसूचित जमाती लोकसंख्या : 42,263 (2.15%)

    साक्षरता

    • संपूर्ण साक्षरता : 1234433( 71.52%)
    • पुरुष साक्षरता : 735402 (81.53%)
    • महिला साक्षरता : 499031 (60.95%)

    जालना जिल्ह्याची महत्वाची माहिती

    • महसुली गावांची संख्या : 9,72
    • ग्रामीण घरांची संख्या : 3,20,908
    • दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : 3,13,103
    • ग्रामीण भागातील शाळांची संख्या : 1,501
    • अंगणवाडीची संख्या : 2,030
    • प्राथमिक आरोग्य केद्राची संख्या : 44
    • प्राथमिक उप-आरोग्य केद्राची संख्या : 223
    • पशु आरोग्य दवाखाने : 59

    पर्यटन स्थळे व देवालये

    जालना जिल्हा देवालयासाठी प्रसिध्द असुन राजुर ता. भोकरदन येथील गणपतीचे मंदीर , अन्वा ता. भोकरदन येथील माहेश्वराचे मंदिर आणि अंबड येथील मत्सोदरी देवीचे मंदिर तसेच नेर ता. जालना येथील वटेश्वराचे मंदिर , परतुर येथील नरसिंहाचे मंदिर , जालना शहरातील भैरवनाथाचे मंदिर, गणपती मंदिर, राम मंदिर, महानुभाव व जैन मंदिर देखिल प्रसिध्द आहे. तसेच जालना शहराच्या मध्यभागी जनार्धन मामांचा पुतळा आहे तसेच नागेवाडी येथील नालंदा बुध्द विहार प्रसिध्द आहे.

    • समर्थ रामदास स्वामी :- समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे झाला. त्यांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहले आहेत. त्यांनी लोकांना देशाभिमानाची शिकवण दिली.
    • आनंदी स्वामी :- येथे आनंदी स्वामी नावाचे थोर संत होऊन गेले ते सर्वांशी समानतेने वागत. गरीबांना मदत करीत , जालना येथे त्यांची समाधी आहे.
    • जानअली व बाबाअली शहा :- जानअली व बाबाअली शहा हे संत देखिल याच जिल्ह्यात होऊन गेलेत. जालना शहरात त्यांचे दर्गे आहेत. व तेथे दरवर्षी उरुस भरतो.
    • राजुर :- भोकरदन तालुक्यातील राजुर येथे गणपतीचे मंदीर असुन संपुर्ण देशभरातुन मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनास येतात.

    जालना जिल्हा परिषदेची संक्षीप्त व सविस्तर माहिती

    • बलवंतराव मेहता समितीने (१९५८) ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केलेली आहे. त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राज ची स्थापना केली. अश्या प्रकारे पंचायत राज पध्दतीचा स्वीकारकरणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील नववे राज्य बनले.
    • जिल्हा परिषद (सामान्यतः जि . प. म्हणून ओळखले जाते.) हि भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे. साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते.
    • जालना जिल्हा परिषदेची स्थापना १ मे रोजी झाली सध्या जालना जिल्हा परिषदेत जालना, बदनापूर, अंबड घनसांगावी, भोकरदन, जाफ्राबाद, परतुर व मंठा ह्या आठ पंचायत समित्या समाविष्ठ आहेत. जिल्हा निर्मितीच्या वेळी जुन्या औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, जाफ्राबाद या चार पंचायत समित्या व परभणी जिल्ह्यातील परतूर समिती जालना जिल्हा परीषदेमध्ये समाविष्ठ करण्यात आल्या.
    • जणगणना २०११ नुसार जालना जिल्ह्याची लोकसंख्या १९.५८ लक्ष आहे. जिल्ह्यात एकूण ७७८ ग्राम पंचायती असुन त्या अंतर्गत एकूण ९७२ गावे आहेत. जालना जिल्हा परिषदेचे मुख्यालय अंबड रोड वर स्थित आहे.