बंद

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

    ओळख प्रस्तावना :

    राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलनकरण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाचीसुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाचीअंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकासविभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्रसंस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक १८जुलै २०११ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला .

    स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीयग्रामीण जीवनोन्नती अभियानात रुपांतर करण्यात आलेले आहे. राज्यातमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान (उमेद) हे अभियान राबविण्या तयेत आहे. उमेद अभियानाचे संचालन ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनयांच्याकडून केले जाते.

    दृष्टिकोन आणि उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

    दृष्टिकोन

    • समन्यायी, समृद्ध, लिंग न्यायपूर्ण आणि सशक्त महाराष्ट्र
    • ग्रामीण गरीबांसाठी कार्यक्षम आणि प्रभावी संस्थात्मक प्लॅटफॉर्म निर्माण करणे
    • ग्रामीण गरीबांना आर्थिक आणि सार्वजनिक सेवांमध्ये सुधारित प्रवेश देणे
    • ग्रामीण गरीबांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे
    • महिलांना स्वयंरोजगार मिळवून देणे

    या कार्यक्रमाचे संक्षिप्त नाव उमेद आहे. या कार्यक्रमाचा उद्देशग्रामीण गरीबांना सशक्त बनवून त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे हाआहे.

    अभियानाची उदिष्ट

    गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो. त्यासाठी त्यासआवश्यृक सहाय्य दिले पाहिजे या विश्वासातून दारिद्रय निर्मूलन करण्या‍साठीग्रामीण गरीबांना एकत्र आणुन, त्यांच्या सक्षम संस्था उभारणे (गरीब वंचितमहिलांचा समावेश स्वंयसहाय्यता गटामध्ये, करणे) सदर संस्थाषमार्फत गरीबांनाएकत्रित करून, त्यांच्या संस्थाची क्षमता वृद्धी व कौशल्या वृध्दी‍ करणे, वित्तीय सेवा पुरवणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करुन देऊन त्यांनादारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे अभियानाचे प्रमुख उदिष्ट आहे.

    अभियानाचे प्रमुख घटक:

    • सामाजिक समावेशन – ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटुंबापर्यंतपोहचुन, त्या कुटुंबातील किमान एक महिलेचा स्वंगयसहाय्यता गटामध्ये समावेश, करणे स्थापित गटांचे ग्राम संघ व प्रभागसंघ संस्थास बांधणी करणे.
    • गरीबांच्या् संस्थांचे बळकटीकरण- गरीबांची व त्यांच्या संस्थेची वृध्दीव कौशल्यी वृध्दीच करणे यासाठी समुदाय संसाधन व्यक्तीच्या सहाय्यानेगरजेनूसार प्रशिक्षण देणे व क्षमता वृद्धी करणे.
    • आर्थिक समावेशन – स्वथयंसहायता गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ इत्यादीमाध्यामातून शासन व बँकामार्फत, गरीब कुटुंबांना जीवनमान उंचावणे, उदयोग वव्यगवसाय वाढविण्याधसाठी गरजेनूसार अर्थसाहय उपलब्ध करुन देणे.
    • शाश्वात उपजीविका- गरीब कुटुंबांचे आर्थिक उत्परन्नर वार्षिक किमान रू. 1 लाख करण्यानच्याी उद्धेशाने रोजगार व स्वतयंरोजगार संधी उपलब्धय करूनदेणे, तसेच गरीबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
    • अभियानाची मुल्येा– प्रमाणिकपणा, उत्त‍रदायित्वी, पारदर्शकता, संवेदनशिलता.
    • अभियानाची व्यापक दृष्टीन– समन्याषयी, लिंग समभावाचे मुल्यच जपणा-याप्रगतीशील महाराष्ट्रा ची निर्मीती, जिथे सर्व नागरिक सुरक्षित सन्मानाने  आणि संपन्नतेचे जीवन जगतील.

    कार्यपद्धती:

    गामीण भागातील गावामध्येस समुदाय संसाधन व्यक्तीवर्धिनी  (5 वर्धिनी -1 टीम) मार्फत 15 दिवस गावफेरीच्या माध्यममातूनगावप्रवेश केला जातो. वंचित कुटुंबातील महिलांचे स्वीयंसाहयता गट स्थापनकेले जातात. स्थापित गटांना सक्षम व बळकटीकरण करणे, उर्वरित गरीबकुटुंबांचा समावेश स्वायंसहयता गटात करणे. यासारखी कामे गावातील (सीआरपी)गट प्रेरिका यांच्या सहाय्याने केली जातात. यामध्येा स्थापित गट आठवडी बैठकघेतात, तसेच दशसुत्रीचे पालन करणारे असतात.

    वंचित कुटुंबांना अर्थिक व समाजिक दृष्टीया सक्षमकरणे, तसेच स्व विकास ते गाव विकास या संकल्पकनेतून गावातील विविध प्रश्नवसोडविण्याससाठी ग्रामसंघाची स्थापना केली जाते. ग्रामीण भागात गावपातळीवरविविध समुदाय संसाधन व्यकक्तीयमार्फत कामे केली जातात. समुदाय संसाधनव्याक्ती मार्फत स्वयंसाहायता गटांना विविध सेवा पुरवण्या.साठी आर्थिकसाक्षरता सखी, एमआयपी सखी, बॅक सखी, कृषी सखी, पशुसखी इत्यावदीची निवडकरण्यात येणार आहे. त्यांखना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्या साठी स्वंतंत्रतालूका कक्ष स्थापन केला आहे.

    जिल्हास्तरावर  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अभियानसंचालक व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामविकास यंत्रणा तथा जिल्हा अभियानसहसंचालक यांच्या मार्गदर्शन व संनियत्रणाखाली जिल्हा कक्षाचेजिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक कार्यरत असतात.